Friday, 18 January 2019

1 problem

मी पश्चिम महाराष्ट्रातील त्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस शेतीवर निगडित एक महत्वाचा प्रॉब्लेम वर बोलणार आहे. परवाच ऊस दराचा प्रश्न अतिशय योग्य म्हणता नाही येणार पण नीट सोडवला.  साहेब बाजारात असलेल्या साखरेच्या भाव आणि उसाचे उत्पादन यावर ऊस दर ठरतो. मग मला काही प्रश्न पडलेत . 
१. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे मुल्याकंन जास्त असूनही एफ आर पी २३० रुपये ९.५ साखर उतारऱ्याला कशी काय? २३० मध्ये १० रुपये तरी वाढ अपेक्षित नव्हती का? कारण सगळ्याच निगडित गोष्टीचे दर वाढलेलं आहेत (खतापासून ते मजुरापर्यंत )
२. १७५ रुपये जास्त देण्याचं ठरल ते त्यामुळेच आहे का? असेल तर हे आधीच का नाही केलं? राजू शेट्टींना आंदोलनाची आशा दाखवण्याची वेळ आली नसती.
मी चुकीचं बोलतोय असं वाटलं तर माफ करा पण तो सर्वांच्या मनातील प्रश्न आहे. 
साहेब, महाराष्ट्रात एखादा उद्योग यावा यासाठी आपल्याला परदेश दौरे करावे लागतात. मग मॅनुफॅक्टअरिंग  किंवा माहिती तंत्रज्ञान सारखी एखादी कंपनी येते त्यांनाही खूप करसवलती द्याव्या लागतात. याही कंपन्या आर्थिक मंदीच्या काळात जास्त रोजगार निर्मिती देऊ नाही शकत. त्या तुलनेत आपला ऊस उद्योग ऑलरेडी सेट झालेला आहे.रोजगारही खूप मोठ्या स्केल वर तयार होतो. तुम्हाला त्याचा अंदाज नक्की असेल.  स्कील डेव्हलपमेंट ची गरज खूप कमी आहे. बाजार पेठ थोडी अस्थिर असली तरी उपाय आपल्याकडे अनुभवाच्या जोरावर शोधता येतात. साखर उद्योग वाढावा अशी आपली योजना असतील हि पण मूळ खोडा वेगळाच आहे तो म्हणजे निसर्ग आणि पाणी, एक वर्ष पाऊस नाही झाला तर शास्त्रीय डोकं चालवणारी माणसं ऊस शेतकऱ्याला आरोप्याच्या पिंजऱ्यात उभा करून फजिती  करायला सुरुवात करतात. डाळिंब केलं तेल्या रोगानं नेलं, द्राक्षे केले आभाळ फाटलं, गारपीठ झाली (सगळं संपत). कांदा केला दर पडलेले असतात. ऊस सोडलं तर असं कोणताच पीक नाही त्याला हमीभाव आहे. म्हणून एकदा का धरणे भरली कि ऊस क्षेत्र वाढत. म्हणून शेतकरी ऊस करतो. नशिबाने कारखाने खूप आहेत. उसाला गाळपाचे अडचण आता होत नाही. पण ...
ठिबक च यश कमी आहे. सर्वजण च काय मीही ठिबक करू शकत नाही. अडचणी कर्जापासून ते पारंपरिक पद्धतीवर आवलंबून आहेत. मी अजिबात म्हणत नाही कि ठिबक यशस्वी होत नाही. नक्कीच यशस्वी होईल त्यासाठी आपणास खालील प्रयोगचा विचार नक्की करावा अशी माझी विनंती आहे.

१.साहेब खरंच सर्वच शेतकऱ्याना आधीच कर्ज खूप बोजा आहे (ते आपल्याला सर्वेच सांगेल)
    नवीन कर्ज तेही ११ टक्के व्याज दराने आणि दीर्घ मुदतीत खरच अशास्वत शेतीला परवडणार  नाही. आणि सरकारी अनुदान शाश्वत असेल  तर ते नक्की घ्यायला काहीच वाटलं नसत. आणि अनुदान पद्धतीवर ठिबक करताना असाही ४० % पण रक्कम खिशातच नाहीतर कुठून आणणार. अनुदान मिळण्यासाठी वाट बघावी लागते. आणि सरकारलाही अनुदान रक्कम व्याजात भरणे शक्य आहे. म्हणजे आशा योजनांचा आपल्या तिजोरीवर जास्त बोजा पडणार नाही असं मला वाटते. 
२. त्यासाठी जर आपण वेगळी योजना केली तर नक्की परवडेल( उसाला ठिबक सिंचन) साठी वेगळे आणि ज्यांनी खरोखर साखर कारखान्याला नोंद दिली आहे, अश्या शेतकऱ्याला ऊस क्षेत्र मोजून बिन व्याजी ३ -५ वर्ष मुदतीचा उसने पैशे कर्ज स्वरूपात सरकारने ठिबक सिंचन सेट घेतलेल्या दुकानदाराच्या नावावर चेक देऊन द्यावे ( आणि ज्याची वसुली इत्तर कर्जाच्या तुलनेत प्राधान्याने करावी. जेणेकरून ते थकीत राहणार नाही. (५० टक्के आनुदानापेक्षा नक्कीच परवडेल).असा ११ टक्के व्याजदर परवडणारा नाही. 
३. यामध्ये छोटा शेत तळे (एकरी ३ लाख लिटर क्षमतेचे ( अंदाजे  ४० बाय ३० बाय १० फूट ) जे संकट काळी अंदाजे १० दिवस एक एकराला राखीव पाणी पुरवेल आणि खणणे  व कागद सहित खर्चही त्याच उसन्या पैशातून होईल अशी योजना बनवावि ), 
शेत तळे प्रत्येक शेतकऱ्याच्या क्षेत्र नुसार वेगळे असेल फक्त एक अनुमान वरती मांडलं आहे. 

४.  असे केले सरकारला एकरी ४० ते ५० हजार रूपये कर्ज स्वरूपात शेतकऱ्याला द्यावे लागेल. (तेवढे कर्ज आता पीक कर्ज म्हणून मिळत पण ते त्या पिकाच्या संवर्धना साठी गरजेचे आहे ) आणि ठिबक सिंचनाच्या कर्ज च्या त्या रकमेचे व्याज फक्त सरकारला भरावे लागेल. तर ५०-७० टक्के ऊस क्षेत्र फक्त व्याज स्वरूपात सरकारकडून ठिबक खाली आणण्याचा प्रयत्न नक्की यशस्वी होईल  असं मला विश्वास आहे.
५. इतर राज्यात उसाला ठिबक साठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न दिसून येत आहेत त्या मानाने आपल्यात कमीच प्रयत्न आहेत. अशी जर एकादी योजना पहिल्यापासून आस्तित्वात असेल नक्की सांगावी जेणेकरून आम्हीही प्रत्येक शेतकर्या पर्यंत पोहचवण्यासाठी नक्की मदत करू. मदतच काय, पण आमच्या मित्रांची एक फौज बनवून स्वयंसेवक म्हणून काम करायलाही तयार आहे. तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते ...
फक्त साहेब ऑलरेडी सेट असलेल्या उद्योगावर कृपया दुर्लक्ष करू नका.आणि आपण करणार नाही  असा विश्वास आहे या  वर्षी पाण्याचं काटेकोर वापर व्हावा असे आपणास वाटत असेल तर आपणास माझ्या सुचवलेल्या अथवा त्याही पेक्षा चांगल्या योजनेचा विचार नक्की करावा लागेल हि विनंती. 
असा नाही कि वरील योजनेत सर्व शेतकरी तयार होतीलच कारण कोणाला अनुदान हवे असते तर कोणाला व्याजदर कमी ते हि एश्चिक करावे. त्याचाही विचार आपण करावा. एकंदरीत योजना या आम्हाला परवडणाऱ्या आहेत पण लाभ शक्य होण्यासाठी काही पर्याय उपलब्ध करावे हि विनंती ..
मी तुम्हाला डायरेक्ट हा संदेश लिहिला कारण विषय अतिमहत्त्वाचा वाटतो, आता यावर उशीर व्हायला नको  असं मला वाटले.
 

बाकी आपण चांगले काम करत आहेत, असेच करत राहावे.. जनतेच्या आशा पूर्ण कराव्या .
आपल्या पुढील कार्यासाठी तमाम शेतकर्या कडून खूप साऱ्या शुभेच्छा !!

रानवारा

रानवारा
मी शेतात नाही चाललो अस  खोट खोट  बापू नि म्हणायचं …तरीही खूप रडायचं  मळइला (नदीच्या काठावरच्या शेताच नाव) जाण्याचा हट्ट करायचा मग आम्ही दोघा लहान  भावा नि पायात चपला न घालताच  त्यांच्या मागे पाळायचं . त्यावेळी  मळइला जाण्याच कारण फक्त एकच होत कि गेल कि मनसोक्त भटकायचं .ऊस ,बोर , गाजरे ,शेंदाडी ,रताळी ,लाल लाल टोमाटो ,जांभूळ ,उंबरे ,मध काही न काहीतरी मिळायचं  आणि  त्यापेक्षा अधिक आनंद देणारी गवताच्या बांधावरची घसरगुंडी .ते दिवस कधी संपले आणि  आयुष्य कधी बदलले हे कळलाच नाही .लहान होतो तेव्हाच एक साधारण २ फुटाची वाळलेल्या लाकडाची काठी हातात दिलेली आणि फक्त ४ शब्दाची  हाक ( चालू कर आणि  बंद कर) ला लाल आणि हिरवा बटन दाबून मोटार कशी चालू  बंद करायची हे शिकवलेलं . त्यानंतर पाटाच पाणी धरताना कपडे चीक्लात भरवून पाणी खेळायचं मज्जा काही औरच । शेतकर्याची लेकरे सर्वसाधारण अशी काम लहानपणापासूनच करतात आणि आज हि कधी कधी तो प्रसंग आल्यावर लहानपण आठवते .
मी शाळे मध्ये  बरा होतो  त्यामुळे घरच्यांनी  मी खूप  शिकावं  अशी अपेक्षा वेळोवेळी व्यक्त केली आणि तसा धडाही दिला आणि त्या मूळेच मी आजवर मजल मारली . सध्या मी PCCOE  येथे ME ला आहे .पण  Engieering chya पहिल्या दिवशी मलाही घर सोडवत नव्हते ना आजवर कधी हि १५ दिवसाहून  जास्त दिवस घर सोडून राहू वाटले नाही . लहान बंधुराजाने मात्र ते अगदी सहज शिक्षणाच्या विऴख्यातून स्वतःला सोडून घेतले आणि रानवारा आपला केला . 
बाहेरच्या जगात अजूनही खूप अज्ञात आहे पण शेतातल्या मात्र पालापाचोल्यापासून सर्व  झाडाच्या पिकाच्या , गवताच्या ,पाखरांच्या ओळखी आहेत. तिथे नाहि  अमावसेच्या काळ्याकुट्ट अंधाराची भीती  . पण इथे अजूनही दिवसा भीती  वाटते बॉम्ब स्फोट,चोरी,करणाराची  आणि रस्त्यावर एकाद्याला मदत करण्याची .  मला तर शेजारच्या flat मध्ये कोण राहते हे अजूनही माहित नाही ,माणुसकी तर इथ  आल्यापासुन कधी अन कधीच आजवर पाहिली नाही . खरच मी कुठल्यातरी विचित्र दुनियेत जगत असल्याची चूक तर नाही न करत अस वाटते बर्याचदा पण पुन्हा पुन्हा त्याचा विचार केल्यावर आपल्याला दिलेल्या जबाबदारीची आठवण होते आणि स्वताला सावरतो . आणि या जगात काही चांगलीही माणसे भेटलीत पण आवर्जून सांगाव वाटते कि ते हि माझासारख रानवारा सोडून इकडे आलेत.अगदी थोडक्यात सांगायचं झाल तर त्यांना माझ्यासोबत असलेला रानवाऱ्या चा गंध येतोय आणि म्हणूनच त्यांनी मला आपलस करून घेतलेय , त्याच तर आधारवर मी या जगात जगतोय ,,
आजही मी घरी जाण्याच्या आधी माझे पाय राना कडे आपोआप वळतात .माझ आणि त्याच नात इतक घट्ट  झालय कि मी ते शब्दात मांडूच नाही शकत आज  जरी माझ्याकडे तीच मळ इ नसली तरी माझ्या  नवीन शेताचा गंध तोच आहे ,, ऊस ,गाजर ,जांभूळ,बोर  काहीना काही मिळते .पण खर  सांगू त्यापेक्षा खूप आनंद होतो तो म्हणजे हिरव्या गार पिकाकडे पाहून ,,, शेताच्या चारही कोपरयावर फिरून … कारण या रक्तामध्ये एक रानवारा भिनलाय ,,,मिसळलाय ,,, भिडला आहे काहीही म्हणा  मला फक्त आणि फक्त आठवतो तो रानवारा ती माती  आणि ती माणसे … आभिमान आहे माझे बापू शेतकरी आहेत  आणि मी शेतकऱ्याचा असल्याचा …………………………  जय किसान